'चॅलेंज' यथातथाच!
स्वा. सावरकरांच्या जीवनावरील नाटक पाहायला जाताना; काळजाला भिडणारे पल्लेदार संवाद, तेजस्वी व्यक्तिरेखा, देशप्रेमाने भारावलेला काळ, यांचे एक जाज्वल्य रसायन रंगमंचावर मूर्तीवंत साकार होणार आहे, अशा अपेक्षा घेऊनच प्रेक्षक जमलेले असतात. मात्र या अपेक्षा निम्म्यानेही पूर्ण करण्यात मुक्ता बर्वे आणि दिनेश पेडणेकर यांची संयुक्त निर्मिती असलेले 'चॅलेंज' हे नवे नाटक यशस्वी ठरले आहे, असे म्हणता येणार नाही. स्वतः नाटककार आणि शब्दप्रभू असलेल्या तात्यारावांना लेखणीतून साकारण्याचे शिवधनुष्य या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, वेशभूषकार आणि अभिनेताही असलेल्या दिग्पाल लांजेकर यांना तितकेसे पेललेले नाही.
नाटकात उभा करण्यात आलेला काळ हा सावरकरांच्या लंडन येथील विद्यार्थी दशेतला आहे. मूळात हा सावरकरांच्या आयुष्यातील सर्वांत झंझावाती काळ होता. रसरसत्या तारुण्यातील सावरकर लंडनमध्ये एकाच वेळी लेखणीचे शस्त्र आणि शस्त्राची लेखणी करून भारतीय सशस्त्रक्रांतीचा लढा नेटाने पुढे रेटत होते. महाविद्यालयीन अभ्यास, क्रांतीची सिद्धता, जनसंपर्क, १८५७चे स्वातंत्र्यसमरसारख्या ऐतिहासिक ग्रंथासाठीचे संशोधन, त्यात भारत भवनाची जबाबदारी अशा अनेक आघाड्या एकाच वेळी सांभाळणाऱ्या तात्यारावांची धीरोदात्तता आणि संयमीपण निखिल राऊत या कलाकाराने रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो केवळ प्रयत्नच असल्याची जाणीव संपूर्ण प्रयोगभर होत राहाते. मदन आणि अन्य सवंगड्यांमधील वाद क्षमवण्यासाठी मध्येच आवाज चढवणार आणि दर 8-10 वाक्यांनी सहकाऱ्यांचे खांदे दणादणा थोपटणारा सावरकरांच्या भूमिकेतील निखिल अगदी केविलवाणा वाटतो.
सावरकरांची हिंदवी स्वातंत्र्य लढ्याकडे आणि स्वतंत्र हिंदुस्थानच्या भविष्याकडे पाहण्याची स्वतःची अशी एक सुस्पष्ट भूमिका होती. ती त्यांच्या काही वाक्यांच्या विस्कळीत मांडणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविता येणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावरकरांनी घेतलेली भूमिका नेमकी काय होती, हेच प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. मदनला प्रेयसीसह एका खोलीत पकडल्यानंतर सावरकर त्याच्यावर रागावतात, त्याला समज देण्याचा प्रयत्न करतात. मात्र मध्येच मदन त्यांना आपले वर्तन योग्यच असल्याचे ठासून सांगतो आणि तेथून विषय भरकटू थेट सावरकरांच्या मुलावर जातो. हे असे अनेक प्रसंग नाटकात आहेत, जिथे आत्ता सावरकर काहीतरी मौलिक सांगतील आहे वाटत असेपर्यंत विषय भलतीकडेच निघून जातो.
स्वा. सावरकरांच्या जीवनावरील नाटक पाहायला जाताना; काळजाला भिडणारे पल्लेदार संवाद, तेजस्वी व्यक्तिरेखा, देशप्रेमाने भारावलेला काळ, यांचे एक जाज्वल्य रसायन रंगमंचावर मूर्तीवंत साकार होणार आहे, अशा अपेक्षा घेऊनच प्रेक्षक जमलेले असतात. मात्र या अपेक्षा निम्म्यानेही पूर्ण करण्यात मुक्ता बर्वे आणि दिनेश पेडणेकर यांची संयुक्त निर्मिती असलेले 'चॅलेंज' हे नवे नाटक यशस्वी ठरले आहे, असे म्हणता येणार नाही. स्वतः नाटककार आणि शब्दप्रभू असलेल्या तात्यारावांना लेखणीतून साकारण्याचे शिवधनुष्य या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, वेशभूषकार आणि अभिनेताही असलेल्या दिग्पाल लांजेकर यांना तितकेसे पेललेले नाही.
नाटकात उभा करण्यात आलेला काळ हा सावरकरांच्या लंडन येथील विद्यार्थी दशेतला आहे. मूळात हा सावरकरांच्या आयुष्यातील सर्वांत झंझावाती काळ होता. रसरसत्या तारुण्यातील सावरकर लंडनमध्ये एकाच वेळी लेखणीचे शस्त्र आणि शस्त्राची लेखणी करून भारतीय सशस्त्रक्रांतीचा लढा नेटाने पुढे रेटत होते. महाविद्यालयीन अभ्यास, क्रांतीची सिद्धता, जनसंपर्क, १८५७चे स्वातंत्र्यसमरसारख्या ऐतिहासिक ग्रंथासाठीचे संशोधन, त्यात भारत भवनाची जबाबदारी अशा अनेक आघाड्या एकाच वेळी सांभाळणाऱ्या तात्यारावांची धीरोदात्तता आणि संयमीपण निखिल राऊत या कलाकाराने रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो केवळ प्रयत्नच असल्याची जाणीव संपूर्ण प्रयोगभर होत राहाते. मदन आणि अन्य सवंगड्यांमधील वाद क्षमवण्यासाठी मध्येच आवाज चढवणार आणि दर 8-10 वाक्यांनी सहकाऱ्यांचे खांदे दणादणा थोपटणारा सावरकरांच्या भूमिकेतील निखिल अगदी केविलवाणा वाटतो.
सावरकरांची हिंदवी स्वातंत्र्य लढ्याकडे आणि स्वतंत्र हिंदुस्थानच्या भविष्याकडे पाहण्याची स्वतःची अशी एक सुस्पष्ट भूमिका होती. ती त्यांच्या काही वाक्यांच्या विस्कळीत मांडणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविता येणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावरकरांनी घेतलेली भूमिका नेमकी काय होती, हेच प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. मदनला प्रेयसीसह एका खोलीत पकडल्यानंतर सावरकर त्याच्यावर रागावतात, त्याला समज देण्याचा प्रयत्न करतात. मात्र मध्येच मदन त्यांना आपले वर्तन योग्यच असल्याचे ठासून सांगतो आणि तेथून विषय भरकटू थेट सावरकरांच्या मुलावर जातो. हे असे अनेक प्रसंग नाटकात आहेत, जिथे आत्ता सावरकर काहीतरी मौलिक सांगतील आहे वाटत असेपर्यंत विषय भलतीकडेच निघून जातो.
आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, यस्य भारत भूमिका।
पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृता।।
पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृता।।
ही सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या आहे, बंधुत्वाची नव्हे, पण लेखकाला ती कुठून तरी लोकांना सांगायची आहे. त्यामुळे ती एका ठिकाणी घुसडून टाकण्यात आली आहे. मूळात ही व्याख्या तात्यारावांनी लंडनमध्ये नव्हे, तर तुरुंगवासाच्या (रत्नागिरी) काळात हिंदुत्व ग्रंथ लिहिताना केली होती. त्यामुळे इथे ऐतिहासिक संदर्भही चुकला आहे.
स्टोव्हवरील कढते रसायन खाली उतरविण्यासाठी सांडशी नसणे, त्यामुळे स्फोटाच्या भीतीने अन्य सहकाऱ्यांनी पळून जाणे आणि सावरकरांच्या आधी मदनने पुढे होऊन हात पोळून घेणे, हे प्रकारही कमालीचे बालिश वाटतात. सांडशी नसताना पदर किंवा रुमालाने घरगृहिणीही चुलीवरचा तवा उचलते, हा सोपा पर्याय तात्यारावांना माहीत नसावा? असाच बालिश प्रसंग फितुराला पकडण्यासाठी खिडकीतून उडी मारण्याचाही वाटतो.
सपक लिखाण- दिग्दर्शन, सुमार पार्श्वसंगीत, निखिल राऊत यांनी ओढाताण करून वटवलेला (की वठवलेला, कोण जाणे) सावरकर, आदी गोष्टींमुळे हे नाटक प्रेक्षकांना सावरकरानुभूतीच्या उंचीवर नेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांनी मृत्यूपूर्वी नियतीला केलेले 'चॅलेंज' हे रंगभूमीवर यथातथाच पेलले गेले आहे.
- संकेत सातोपे
स्टोव्हवरील कढते रसायन खाली उतरविण्यासाठी सांडशी नसणे, त्यामुळे स्फोटाच्या भीतीने अन्य सहकाऱ्यांनी पळून जाणे आणि सावरकरांच्या आधी मदनने पुढे होऊन हात पोळून घेणे, हे प्रकारही कमालीचे बालिश वाटतात. सांडशी नसताना पदर किंवा रुमालाने घरगृहिणीही चुलीवरचा तवा उचलते, हा सोपा पर्याय तात्यारावांना माहीत नसावा? असाच बालिश प्रसंग फितुराला पकडण्यासाठी खिडकीतून उडी मारण्याचाही वाटतो.
सपक लिखाण- दिग्दर्शन, सुमार पार्श्वसंगीत, निखिल राऊत यांनी ओढाताण करून वटवलेला (की वठवलेला, कोण जाणे) सावरकर, आदी गोष्टींमुळे हे नाटक प्रेक्षकांना सावरकरानुभूतीच्या उंचीवर नेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांनी मृत्यूपूर्वी नियतीला केलेले 'चॅलेंज' हे रंगभूमीवर यथातथाच पेलले गेले आहे.
- संकेत सातोपे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा